Monday, 31 October 2016

श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय

। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय
(2)🙏🙏

॥ श्री गणेशाय नमः ॥ कामना धरोनी जे भजती । होय त्यांची मनोरथपूर्ति । तैसेचि निष्काम भक्ताप्रती । कैवल्यप्राप्ती होतसे ॥१॥ नृसिंहसरस्वती प्रगट झाले । अगणित पापी तारिले । कर्दळीवनी गुप्त जहाले । गुरुचरित्री ती कथा ॥२॥ पुढे लोकोद्धाराकारणे । भाग पडले प्रगट होणे । धुंडिली बहुत पट्टणे । तेचि स्वामी यतिवर्य ॥३॥ स्वामींची जन्मपत्रिका । एका भक्ते केली देखा । परी तिजविषयी शंका । मनामाजी येतसे ॥४॥ गुरुराज गुप्त झाले । स्वामीरूपे प्रगटले । त्यांचे शकप्रमाण न मिळे । म्हणोनि शंका पत्रिकेची ॥५॥ ते केवळ अनादिसिद्ध । खुंटला तेथे पत्रिकावाद । लोकोद्धारासाठी प्रसिद्ध । मानवरूपे जाहले ॥६॥ अक्कलकोटा-माझारी । राचप्पा मोदी याचे घरी । बैसली समर्थांची स्वारी । भक्तमंडळी वेष्टित ॥७॥ साहेब कोणी कलकत्त्याचा । हेतू धरोनी दर्शनाचा । पातला त्याच दिवशी साचा । आदर तयाचा केला की ॥८॥ त्याजसवे एक पारसी । आला होता दर्शनासी । ते येण्यापूर्वी मंडळीसी । महाराजांनी सुचविले ॥९॥ तीन खुर्च्या आणोनी बाहेरी । मांडा म्हणती एके हारी । दोघांसी बैसवोनी दोहोवरी । तिसरीवरी बैसले आपण ॥१०॥ पाहोनी समर्थांचे तेज । उभयतांसी वाटले चोज । साहेबाने प्रश्न केला सहज । आपण आला कोठूनी ॥११॥ स्वामींनी हास्यमुख करोनी । उत्तर दिले तयालागोनी । आम्ही कर्दळीवनांतुनी । प्रथमारंभी निघालो ॥१२॥ मग पाहिले कलकत्ता शहर । दुसरी नगरे देखिली अपूर्व । बंगालदेश समग्र । आम्ही असे पाहिला ॥१३॥ घेतले कालीचे दर्शन । पाहिले गंगातटाक पावन । नाना तीर्थे हिंडोन । हरिद्वाराप्रती गेलो ॥१४॥ पुढे पाहिले केदारेश्वर । हिंडलो तीर्थे समग्र । ऐसी हजारो हजार । नगरे आम्ही देखिली ॥१५॥ मग तेथुनी सहज गती । पातलो गोदातटाकाप्रती । जियेची महाप्रख्याती । पुराणांतरी वर्णिली ॥१६॥ केले गोदावरीचे स्नान । स्थळे पाहिली परम पावन । काही दिवस फिरोन । हैदराबादेसी पातलो ॥१७॥ येउनिया मंगळवेढ्यास । बहुत दिवस केला वास । मग येउनिया पंढरपुरास । स्वेच्छेने तेथे राहिलो ॥१८॥ तदनंतर बेगमपूर । पाहिले आम्ही सुंदर । रमले आमुचे अंतर । काही दिवस राहिलो ॥१९॥ तेथोनि स्वेच्छेने केवळ । मग पाहिले मोहोळ । देश हिंडोनी सकळ । सोलापुरी पातलो ॥२०॥ तेथे आम्ही काही महिने । वास केला स्वेच्छेने । अक्कलकोटा-प्रती येणे । तेथोनिया जाहले ॥२१॥ तैपासूनि या नगरात । आनंदे आहो नांदत । ऐसे आमुचे सकल वृत्त । गेले उठोनी उभयता ॥२२॥ ऐकोनिया ऐशी वाणी । उभयता संतोषले मनी । मग स्वामी आज्ञा घेवोनी । गेले उठोनी उभयता ॥२३॥ द्वादश वर्षे मंगळवेढ्याप्रती । राहिले स्वामीराज यती । परी त्या स्थळी प्रख्याती । विशेष त्यांची न जाहली ॥२४॥ सदा वास अरण्यात । बहुधा न येती गावात । जरी आलिया क्वचित । गलिच्छ जागी बैसती ॥२५॥ कोणी काही आमोनि देती । तेचि महाराज भक्षिती । क्षणैक राहूनि मागुती । अरण्यात जाती उठोनी ॥२६॥ वेडा बुवा तयांप्रती । गावातील लोक म्हणती । कोणीही अज्ञाने नेणती । परब्रह्मरुप हे ॥२७॥ त्या समयी नामे दिगंबर । वृत्तीने केवळ जे शंकर । तेव्हा तयांचा अवतार । सोलापुरी जाहला ॥२८॥ ते जाणोनी अंतरखूण । स्वामींसी मानिती ईश्वरासमान । परी दुसरे अज्ञ जन । वेडा म्हणोनी लेखिती ॥२९॥ दर्शना येता दिगंबर । लीलाविग्रही यतिवर्य । कंबरेवरी ठेवूनी कर । दर्शन देती तयासी ॥३०॥ अमृतासमान पुढे कथा । ऐकता पावन श्रोता वक्ता । स्वामी समर्थ वदविता । ज्यांची सत्ता सर्वत्र ॥३१॥ अहो हे स्वामी चरित्र । भरला असे क्षिरसागर । मुक्त करोनी श्रवणद्वार । प्राशन करा श्रोते हो ॥३२॥ तुम्हा नसावा येथे वीट । सर्वदा सेवावे आकंठ । भवभयाचे अरिष्ट । तेणे चुके विष्णू म्हणे ॥३३॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । आनंदे भक्त परिसोत । द्वितीयोऽध्याय गोड हा ॥३४॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻

स्वामीचरिञ अध्याय २रा.
या अध्यायामध्ये
पुढील प्रमाणे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे .
नृसिंह सरस्वती प्रगट झाले तेव्हा त्यांनी कितीतरी अगणित पापी तारले. पुढे ते कर्दळीवनात गुप्त झाले  असे गुरूचरिञ या मध्ये सांगण्यात आले आहे .पुढे याचा ठिकाणी म्हणजे कर्दळी वनामध्ये स्वामी प्रकट  झाले ,
पुढे स्वामी अक्कलकोटला गेले .स्वामी ऐके ठिकाणी बसता त्यांना विचारण्यात आले की आपण कोठून आला आहात तेव्हा स्वामीनी उत्तर दिले की आम्ही कर्दळी वनात प्रकटलो, मग आम्ही कलकत्ता, बंगालदेश, पाहिले, कालीचे दर्शन घेतले .हरिव्दारला गेलो, केदारेश्वर पाहिले, असे हजारो नगरे आम्ही फिरलो  पुढे हैद्राबाद ला गेलो, मंगळवेढ्यास गेलो तेथे देखील वास केला, मग पंढरपूर वरून येथे अक्कल कोटी आलो.नंतर आम्ही बेगमपूर आणि मोहोळ पाहिले आणि मग अक्कलकोटी वास्तव्यस आलो
स्वामी जेव्हा अक्कलकोट मध्ये आले तेव्हा त्याची प्रख्याती विशेष नव्हती , जे सदा वास अरण्यात करत असत, गलिच्छ जागी बसत असत, कोणी काही आणून दिले तर ते खात.लोक त्यांना वेडा बुवा म्हणत.
त्या वेळी दिगंबर नावाचा एक व्यक्ती होता त्याला स्वामीनी दिव्य असे कंबरेवर हात ठेऊन दर्शन दिले.
असे काही थोडे फार दुसरा अध्यायाचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे..
🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

Sunday, 30 October 2016

स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय

श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय
(1) 🙏

॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥ श्री अक्कलकोट निवासी-पूर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामिराजाय नमः ॥

ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद़्गुरुं तं नमामि ॥

जयजय श्री जगरक्षका । जयजयाजी भक्तपालका । जयजय कलिमलनाशका । अनादिसिद्धा जगद्गुरु ॥१॥ जयजय क्षीरसागर विलासा । मायाचक्रचालका अविनाशा । शेषशयना अनंतवेषा । अनामातीता अनंता ॥२॥ जयजयाजी गरुडवाहना । जयजयाजी कमललोचना । जयजयाची पतितपावना । रमारमणा विश्वेशा ॥३॥ मेघवर्ण आकार शांत । मस्तकी किरीट विराजित । तोच स्वयंभू आदित्य । तेज वर्णिले न जाय ॥४॥ विशाळ भाळ आकर्ण नयन । सरळ नासिका सुहास्य वदन । दंतपंक्ति कुंदकळ्यांसमान । शुभ्रवर्ण विराजती ॥५॥ रत्नमाला हृदयावरी । जे कोटी सूर्यांचे ते हरी । हेममय भूषणे साजिरी । कौस्तुभमणि विशेष ॥६॥ वत्सलांच्छनाचे भूषण । चेति प्रेमळ भक्तिची खूण । उदरी त्रिवळी शोभायमान । त्रिवेणीसंगमासारखी ॥७॥ नाभिकमल सुंदर अति । जेथे विधात्याची उत्पत्ती । की चराचरा जन्मदाती । मूळ चननी तेचि पै ॥८॥ जानूपर्यंत कर शोभति । मनगटी कंकणे विराजती । करकमलांची आकृति । रक्तपंकजासमान ॥९॥ भक्ता द्यावया अभय वर । सिद्ध सर्वदा सव्य कर । गदा पद्म शंख चक्र । चार हस्ती आयुधे ॥१०॥ कांसे कसिला पीतांबर । विद्युल्लतेसम तेज अपार । कर्दळीस्तंभापरी सुंदर । उभय जंघा दिसताती ॥११॥ जेथे भक्तजन सुखावती । ज्याच्या दर्शने पतीत तरती । ज्याते अहोरात्र ध्याती । नारदादि ऋषिवर्य ॥१२॥ ज्याते कमला करे चुरीत । संध्यारागा समान रक्त । तळवे योग्य चिन्हे मंडित । वर्णित वेद शीणले ॥१३॥ चौदा विद्या चौसष्ट कला । ज्याते वर्णित थकल्या सकळा । ऐशा त्या परम मंगला । अल्पमती केवि वर्णू ॥१४॥ नारदादि मुनीश्वर । व्यास वाल्मिकादि कविवर । लिहू न शकले महिमांवर । तेथे पामर मी काय ॥१५॥ जो सकळ विश्वाचा जनिता । समुद्रकन्या ज्याची कांता । जो सर्व कारण कर्ता । ग्रंथारंभी नमू तया ॥१६॥ त्या महाविष्णूचा अवतार । गजवदन शिवकुमार । एकदंत फरशधर । अगम्य लीला जयांची ॥१७॥ जो सकळ विद्यांचा सागर । चौसष्ट कलांचे माहेर । रिद्धि सिद्धीचा दातार । भक्त पालक दयाळू ॥१८॥ मंगल कार्या करिता स्मरण । विघ्नें जाती निरसोन । भजका होई दिव्य ज्ञान । वेदांतसार कळे पां ॥१९॥ सकल कार्यारंभी जाणा । करिती ज्याच्या नामस्मरण । ज्याच्या वरप्रसादे नाना । ग्रंथरचना करिती कवी ॥२०॥ तया मंगलासी साष्टांग नमन । करूनी मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । निर्विघ्नपणे होवो हे ॥२१॥ जिचा वरप्रसाद मिळता । मूढ पंडित होती तत्त्वता । सकळ काव्यार्थ येत हाता । ती ब्रह्मसुता नमियेली ॥२२॥ मूढमती ती अज्ञान । काव्यादिकांचे नसे ज्ञान । माते तू प्रसन्न होवोन । ग्रंथरचना करवावी ॥२३॥ जो अज्ञानतिमिरनाशक । अविद्याकाननच्छेदक । जो सद़्बुद्धीचा प्रकाशक । विद्यादायक गुरुवर्य ॥२४॥ ज्याचिया कृपेकरोन । सच्छिष्या लाधे दिव्यज्ञान । तेणेच जगी मानवपण । येतसे की निश्चये ॥२५॥ तेवी असता मातापितर । तैसेचि श्रेष्ठ गुरुवर्य । चरणी त्यांचिया नमस्कार । वारंवार साष्टांग ॥२६॥ मी मतिमंद अज्ञ बाळ । घेतली असे थोर आळ । ती पुरविणार दयाळ । सद़्गुरुराज आपणची ॥२७॥ नवमास उदरी पाळिले । प्रसववेदनांते सोशिले । कौतुके करूनी वाढविले । रक्षियेले आजवरी ॥२८॥ जननीजनका समान । अन्य दैवत आहे कोण । वारंवार साष्टांग नमन । चरणी तयांच्या करीतसे ॥२९॥ ब्रम्हा विष्णू महेश्वर । तिन्ही देवांचा अवतार । लीलाविग्रही अत्रिकुमार । दत्तात्रेय नमियेला ॥३०॥ तीन मुखे सहा हात । गळा पुष्पमाळा शोभत । कर्णी कुंडले तेज अमित । विद्युल्लतेसमान ॥३१॥ कामधेनू असोनि जवळी । हाती धरिली असे झोळी । जो पहाता एका स्थळी । कोणासही दिसेना ॥३२॥ चार वेद होउनी श्वान । वसती समीप रात्रंदिन । ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो ॥३३॥ त्या परब्रम्हासी नमन । करोनि मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । होवो कृपेने आपुल्या ॥३४॥ वाढला कलीचा प्रताप । करू लागले लोक पाप । पावली भूमि संताप । धर्मभ्रष्ट लोक बहू ॥३५॥ पहा कैसे दैव विचित्र । आर्यावर्ती आर्यपुत्र । वैभवहीन झाले अपार । दारिद्र्य, दुःखे भोगिती ॥३६॥ शिथिल झाली धर्मबंधने । नास्तिक न मानिती वेदवचने । दिवसेंदिवस होमहवने । कमी होऊ लागली ॥३७॥ सुटला धर्माचा राजाश्रय । अधर्मप्रवर्तका नाही भय । उत्तरोत्तर नास्तिकमय । भरतखंड जाहले ॥३८॥ नाना विद्या कला । अस्तालागी गेल्या सकला । ऐहिक भोगेच्छा बळावल्या । तेणे सुटला परमार्थ ॥३९॥ धर्मसंस्थापनाकारणे । युगायुगी अवतार घेणे । नानाविध वेष नटणे । जगत्पतीचे कर्तव्य ॥४०॥ लोक बहु भ्रष्ट झाले । स्वधर्माते विसरले । नास्तिकमतवादी मातले । आर्यधर्माविरुद्ध ॥४१॥ मग घेतसे अवतार । प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार । अक्कलकोटी साचार । प्रसिद्ध झाला स्वामीरुपे ॥४२॥ कोठे आणि कोणत्या काळी । कोण्या जातीत कोणत्या कुळी । कोण वर्णाश्रम धर्म मुळी । कोणासही कळेना ॥४३॥ ते स्वामी नामे महासिद्ध । अक्कलकोटी झाले प्रसिद्ध । चमत्कार दाविले नानाविध । भक्त मनोरथ पुरविले ॥४४॥ त्यांसी साष्टांग नमोनी । करी प्रार्थना कर जोडोनी । आपुला विख्यात महिमा जनी । गावयाचे योजिले ॥४५॥ तुमचे चरित्र महासागर । पावेन कैसा पैलतीर । परि आत्मसार्थक करावया साचार । मीन तेथे जाहलो ॥४६॥ किंवा अफाट गगनासमान । अगाध आपुले महिमान । अल्पमती मी अज्ञान । आक्रमण केवी करू ॥४७॥ पिपीलिक म्हणे गिरीसी । उचलून घालीन काखेसी । किंवा खद्योत सूर्यासी । लोपवीन म्हणे स्वतेजे ॥४८॥ तैसी असे माझी आळ । बाळ जाणूनी लडिवाळ । पुरविता तु दयाळ । दीनबंधू यतिवर्या ॥४९॥ कर्ता आणि करविता । तूचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची ॥५०॥ ऐसी ऐकुनिया स्तुती । संतोषली स्वामीराजमूर्ति । कविलागी अभय देती । वरदहस्ते करोनी ॥५१॥ उणे न पडे ग्रंथांत । सफल होतील मनोरथ । पाहूनी आर्यजन समस्त । संतोषतील निश्चये ॥५२॥ ऐसी ऐकोनि अभयवाणी । संतोष झाला माझिया मनी । यशस्वी होवोनी लेखणी । ग्रंथसमाप्तीप्रति होवो ॥५३॥ आतां नमू साधुवृंद । ज्यासी नाही भेदाभेद । ते स्वात्मसुखी आनंदमय । सदोदित राहती ॥५४॥ मग नमिले कविश्वर । जे शब्दसृष्टीचे ईश्वर । ज्यांची काव्ये सर्वत्र । प्रसिद्ध असती या लोकी ॥५५॥ व्यास वाल्मिक महाज्ञानी । बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी । वारंवार तयांच्या चरणी । नमन माझे साष्टांग ॥५६॥ कविकुलमुकुटावतंस । नमिले कवि कालिदास । ज्यांची नाट्यरचना विशेष । प्रिय जगी जाहली ॥५७॥ श्रीधर आणि वामन । ज्यांची ग्रंथरचना पाहोन । ज्ञातेही डोलविती मान । तयांचे चरण नमियेले ॥५८॥ ईशचरणी जडले चित्त । ऐसे तुकारामादिक भक्त । ग्रंथारंभी तया नमित । वरप्रसादाकारणे ॥५९॥ अहो तुम्ही संत जनी । मज दीनावरी कृपा करोनी । आपण हृदयस्थ राहोनी । ग्रंथरचना करवावी ॥६०॥ आता करू नमन । जे का श्रोते विलक्षण । महाज्ञानी आणि विद्वान । श्रवणी सादर बैसले ॥६१॥ महापंडित आणि चतुर । ऐसा श्रोतृसमाज थोर । मतिमंद मी त्यांच्यासमोर । आपले कवित्व केवी आणू ॥६२॥ परी थोरांचे लक्षण । एक मला ठाउके पूर्ण । काही असता सद्गुण । आदर करिती तयाचा ॥६३॥ संस्कृताचा नसे गंध । मराठीही न ये शुद्ध । नाही पढलो शास्त्रछंद । कवित्वशक्ती अंगी नसे ॥६४॥ परी हे अमृत जाणोनी । आदर धरावा जी श्रवणी । असे माझी असंस्कृत वाणी । तियेकडे न पहावे ॥६५॥ न पाहता जी अवगुण । ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण । एवढी विनंती कर जोडोनी । चरणी आपुल्या करीतसे ॥६६॥ स्वामींच्या लीला बहुत । असती प्रसिद्ध लोकांत । त्या सर्व वर्णिता ग्रंथ । पसरेल समुद्रसा ॥६७॥ त्या महोदधीतुनी पाही । अमोल मुक्ताफळे घेतली काही । द्यावया मान सूज्ञाही । अवमान काही न करावा ॥६८॥ की हे उद्यान विस्तीर्ण । तयामाजी प्रवेश करोन । सुंदर कुसुमे निवडोन । हार त्यांचा गुंफिला ॥६९॥ कवि होवोनिया माळी । घाली श्रोत्यांच्या गळी । उभा ठाकोनि बद्धांजुळी । करी प्रार्थना सप्रेमे ॥७०॥ अहो या पुष्पांचा सुवास । तृप्त करील आपुले मानस । हा सुगंध नावडे जयास । तेचि पूर्ण अभागी ॥७१॥ आता असोत हे बोल । पुढे कथा बहु अमोल । वदविता स्वामी दयाळ । निमित्त मात्र विष्णुकवि ॥७२॥ वैराग्य प्रत्यक्ष शंकर । तेजे कैसा सहस्त्रकर । दुष्टां केवळ सूर्यपुत्र । भक्तां मातेसमान ॥७३॥ यतिराजपदकल्हार । विष्णुकवि होऊनी भ्रमर । ज्ञानमधुस्तव साचार । रुंची तेथे घालीतसे ॥७४॥ इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । आदरे भक्त परिसोत । प्रथमोऽध्याय गोड हा ॥७५॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻
स्वामीचरिञ अध्याय-१ला

या अध्यायमध्ये जे काही सांगितले आहे ते सांगण्याचा एक अत्यल्प प्रयत्न करत आहे .
त्या काळी कलीचा प्रताप वाढला होता, लोक पापे करू लागली होती , ठिकठिकाणी द्रारिद्य , दुःख निर्माण झाले होते .सर्वत्र दुःखी दीन दुबळी परिस्थिती निर्माण झाली होती.नास्तिक लोक वेद वचने मानत नव्हती .होमहवने कमी होऊ लागली होती , धर्माचा राजाश्रय सुटला होता, जे अधर्मप्रवर्तक होते त्यांना कसलेच भय नव्हते , ज्या काही नाना विद्या आणि कला होत्या त्या संपूष्टात  गेल्या होत्या , त्यामुळे त्या ठिकाणी परमार्थ सुटला होता.लोक भ्रष्ट झाले होते, स्वधर्माला विसरले होते , सर्वञ नास्तिकमतवादी परिस्थिती निर्माण झाली होती.
मग त्यानंतर दत्ताञय अवतार परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटी प्रसिद्ध झाले .
स्वामी प्रथम कर्दळीवनात प्रकट झाले होते .स्वामी अक्कल कोट मध्ये आल्यानंतर सर्वांना प्रश्न पडू लागला कोण हा पुरूष कोठून आला आहे , याचे धर्म , कूळ कोणते , कोणत्या जातीचा आहे .
नंतर स्वामीनी अक्कलकोट मध्ये चमत्कार करून दाखवले म्हणून ते अक्कलकोटी स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध झाले .
नंतर पुढे श्रीधर, वामन,अनेक महाज्ञानी विद्वान हे स्वामीच्या ज्ञानापुढे कमी पडले.
स्वामीच्या लीला अगाध आहेत असे पहिल्या अध्यायात सांगण्यात आले, या अध्यायत सांगितले की पुढील सर्व अध्यायामध्ये स्वामीच्या लिलाचे वर्णन केले आहे .

असा हा खुप अत्यल्प असा या अध्यायचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे , या अध्यायात आणखी खुप काही माहिती आहे पण जेवढे या बृध्दीला सांगता आले तेवढे सांगण्याचा प्रयत्न केला आहे जे जे बरोबर असेल ते सर्व काही स्वामीचे आणि जे जे चुकीचे असेल ते माझे..
🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

भाई दुज कथा

भाई दूज की कथा इस प्रकार है- सूर्य की पत्नी संज्ञा की दो संतानें थीं। संज्ञा के पुत्र का नाम यमराज और पुत्री का नाम यमुना था। संज्ञा अपने पति सूर्य की तेज किरणों को सहन नहीं कर सकने के कारण उत्तरी ध्रुव में छाया बनकर रहने लगी। इसी से ताप्ती नदी तथा शनिश्चर का जन्म हुआ। इसी छाया से सदा युवा रहने वाले अश्विनी कुमारों का भी जन्म हुआ, जो देवताओं के वैद्य माने जाते हैं। उत्तरी ध्रुव में बसने के बाद संज्ञा (छाया) का यम तथा यमुना के साथ व्यवहार में अंतर आ गया। इससे व्यथित होकर यम ने अपनी नगरी यमपुरी बसाई। यमुना अपने भाई यम को यमपुरी में पापियों को दंड देते देख दु:खी होती, इसलिए वह गोलोक चली गई। समय व्यतीत होता रहा। तब काफी सालों के बाद अचानक एक दिन यम को अपनी बहन यमुना की याद आई। यम ने अपने दूतों को यमुना का पता लगाने के लिए भेजा, लेकिन वह कहीं नहीं मिली। फिर यम स्वयं गोलोक गए, जहां यमुनाजी की उनसे भेंट हुई। इतने दिनों बाद यमुना अपने भाई से मिलकर बहुत प्रसन्न हुई। यमुना ने भाई का स्वागत किया और स्वादिष्ट भोजन करवाया। इससे भाई यम ने प्रसन्न होकर बहन से वरदान मांगने के लिए कहा। तब यमुना ने वर मांगा - 'हे भैया, मैं चाहती हूं कि जो भी मेरे जल में स्नान करे, वह यमपुरी नहीं जाए।' ​यह सुनकर यम चिंतित हो उठे और मन-ही-मन विचार करने लगे कि ऐसे वरदान से तो यमपुरी का अस्तित्व ही समाप्त हो जाएगा। भाई को चिंतित देख, बहन बोली- भैया आप चिंता न करें, मुझे यह वरदान दें कि जो लोग आज के दिन बहन के यहां भोजन करें तथा मथुरा नगरी स्थित विश्रामघाट पर स्नान करें, वे यमपुरी नहीं जाएं। यमराज ने इसे स्वीकार कर वरदान दे दिया। बहन-भाई के मिलन के इस पर्व को अब भाई-दूज के रूप में मनाया जाता है।

श्री लक्ष्मी कुबेर पूजन विधी

नमस्कार सेवेकरी हो 🙏🏻

🚩शुभ दीपावली
(श्रीलक्ष्मी कुबेर पुजन माहिती)🚩

🚩 श्रीलक्ष्मी कुबेरा ची पुजन विधी माहिती या लेखातून करून घेऊ 🙏🏻

🚩या दिवशी श्रीलक्ष्मी कुबेर पुजन सोबत
महाकाली(काळी शाई)

/महालक्ष्मी(धन/रूपये)

/महासरस्वती(वही/खाते)

व चित्रगुप्त(पेन/दऊ)

व कुबेरपूजन (तिजोरी/माती चे बोळके कुबेर भंडार स्वरूपात) पुजन व आरती करावी🙏🏻

आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन करतो. लक्ष्मीपूजना
करिता आपण घरातील सोन्याचे दागदागिने, जडजवाहिर, सोन्याचांदीचे जिन्नस व चांदीची नाणी एकत्र करुन, तीच लक्ष्मी आहे व संपत्ती देणारी देवता आहे अशा भावनेने तिची पूजा करतो. 🙏🏻

असेच लौकिकद्रुष्ट्या
सर्वत्र लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाने पैसा, संपत्ती तसेच सर्व प्रकारचे वैभव प्राप्त होते अशी आपली श्रद्धा असते.लक्ष्मी ही संपतीची देवता आहे हे खरे आहे. तशीच ती नित्य विष्णूच्या सेवेत असते हे ही तितकेच खरे आहे. हरिप्रिया म्हणजे श्रीहरीला प्रिय अशी ती आहे. श्रीविष्णूला सोडून ती जात नाही. अशा परिस्थितीत दिवाळीच्या प्रसंगी लक्ष्मीपूजनाचे वेळी तिला आवाहन केल्यास ती एकटी येईल कां ?
ती तर विष्णूच्या सेवेत गर्क आहे. श्रीविष्णू हा क्षीरसागरी शेषाच्या शय्येवर विराजमान असून हरीप्रिया लक्ष्मी ही त्याच्या सेवेत रममाण झालेली आहे. ती विष्णूला सोडून कशी येणार ?श्रीविष्णूला श्रीमान असे म्हटले आहे म्हणजे श्री अर्थात लक्ष्मी, संपत्ती शोभा व सौंदर्य ज्याच्याजवळ नित्य आहे किंवा श्री म्हणजे लक्ष्मीदेवता पत्नीरुपाने ज्याच्याजवळ असते असा महविष्णु. विष्णूला माधव असेही म्हणतात. मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती अर्थात लक्ष्मीचा पती. म्हणूनच त्याला श्रीपती असेही म्हणतात. विष्णूचे असे स्वरुप पाहता लक्ष्मी विष्णूला सोडून एकटी कशी येणार ? म्हणूनच लक्ष्मीपूजनाचे प्रसंगी लक्ष्मीनारायण या दांपत्यास आदराने बोलावले पाहिजे.तुम्हाला लक्ष्मी, संपत्ती वैभव पाहिजे ना? मग लक्ष्मीपूजनाचे दिवशी श्रीविष्णूना आवाहन करून त्यांची यथासांग पूजा करा. 🙏🏻

तो महाविष्णू भक्तवत्सल आहे. हाकेसरशी धावून येतो असा त्याचा लौकिक आहे. श्री विष्णूंचे आगमन झाले की त्यांचेबरोबर महालक्ष्मी येणारच यात शंका नाही कारण ती नित्य विष्णूसमवेत छायेसारखी वावरत असते. अशा लक्ष्मीचा आदर करा. ती देवता आहे. तिला बँकेच्या लॉकर मध्ये बंदिस्त करुन तिचा कोंडमारा करू नका.तेव्हा लक्ष्मीप्राप्तीकरिता लक्ष्मीपूजनाचे दिवशी महाविष्णूला प्रथम आवाहन करून त्याची पूजा करा.🙏🏻
त्याचे स्तवन करा. विष्णुसहस्रनामाचा पाठ करा म्हणजे लक्ष्मीदेवतानक्कीच प्रसन्न होईल.
करण कोणत्या पतिव्रतेला आपल्या प्राणप्रिय पतीचा गौरव आवडणार नाही ?

अहो, एक बाब विसरलीच. लक्ष्मी हे सुद्धा प्रत्यक्ष विष्णूचे दुसरे नाव आहे. संपत्तीची अधिदेवता असलेली लक्ष्मी ही ज्याचे स्वरुप आहे असा महाविष्णू आहे असे विष्णुसहस्त्रनामात आहे ( श्रीविष्णूचे ९४३ वे नाव) अतएव विष्णूची पूजा म्हणजेच लक्ष्मीपूजन.🙏🏻

एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा. महाविष्णू हा पांचजन्य नावाचा शंख धारण करणारा आहे. श्रीविष्णूच्या पूजेला शंखाची आवश्यकता असते. शंखाशिवाय विष्णूची पूजाच होऊ शकत नाही. यास्तव प्रथम शंखमहाराजांना बोलवणे पाठवा आणि मगच लक्ष्मीनारायणाला.🙏🏻

लक्ष्मीपूजनाचे दिवशी खऱ्या अर्थाने महालक्ष्मीस्वरुपी विष्णूची पूजा श्रद्धेने भावनेने आणि शुद्ध अन्तःकरणाने करून ऐहिक तशीच मानसिक श्रीमंती मिळवावी, हाच या लेखाचा मतितार्थ.🙏🏻

🚩धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!

या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत ही प्रार्थना 🙏🏻

आश्विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांशनानाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते.या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. 🚩🙏🏻

आज आपण लक्ष्मीपूजनासंदर्भात माहिती पाहूया.🚩🙏🏻

१. कोजागरी पौर्णिमा व श्री लक्ष्मीपूजन : कोजागरीस लक्ष्मी व इंद्र या देवतांचे पूजन सांगितले आहे, तर आश्विन अमावास्येस लक्ष्मी व कुबेर या देवतांचे पूजन सांगितले आहे.🙏🏻

🚩२. श्री लक्ष्मी व कुबेर : लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे, तर कुबेर हा संपत्ती-संग्राहक आहे.अनेकांना पैसा मिळविण्याची कला साध्य असते; पण तो राखावा कसा हे माहीत नसल्यामुळे अनाठायी खर्च होऊन पैसा त्यांच्याजवळ शिल्लक रहात नाही. किंबहुना पैसा मिळविण्यापेक्षातो राखणे, सांभाळणे व योग्य ठिकाणीच खर्च करणे हे फार महत्त्वाचे आहे. कुबेर ही देवता `पैसा कसा राखावा', हे शिकविणारीआहे, कारण तो धनाधिपती आहे; म्हणून या पूजेसाठी लक्ष्मी व कुबेर या देवता सांगितलेल्या आहेत. सर्वच लोक विशेषत: व्यापारी ही पूजा मोठ्या उत्साहाने व थाटामाटात करतात.पुजन विधी"ॐ गं गणपतेय नम: " म्हणत पूजा करावी."

नंतर प्रथम सुपारी स्वरूपात गणपती हा दक्षिण कडे पानावर अक्षदा ठेऊन पुजन करने नंतर भुमी म्हणजे पृथ्वी पुजन करने नंतर दिपनाथ म्हणजे दिव्याची व सूर्याच्या पुजन करने नंतर श्रीगणेशाच्या उत्तर दिशेने मंगल कलश स्थापना करुन पूजन करने या नंतर'श्री लक्ष्मी ' च्या मूर्तीच्या प्रतीष्टापना चा अधिकार प्राप्ती साठी मन व मानव स्वरूप शरीर शुध्द करने ते म्हणजे प्रथम ॐ गं गणपतये नम: असे म्हणून ह्दय यास उजवा हात लावा मग शिरसो म्हणजे
डोक्याला हात लावून मग शिखा म्हणजे डोक्याच्या मागच्या बाजूला हात लावून मग शरीराला कवच म्हणजे दोन्ही बहूना हात लावून कवच करावे मग अनामिका व तजनी हे दोन्ही बोटे डोळे मिटून स्पर्श करने मग उजव्या काना कडून हात फिर उन डवा हाता वर तळी वाजवावी मग लक्ष्मी पूजन करावे व प्रान प्रतिष्ठा करवीया सोबत महाकाली(काळी शाई)/महालक्ष्मी(धन/रूपये)/महासरस्वती(वही/खाते)व चित्रगुप्त(पेन/दऊ) व कुबेरपूजन (तिजोरी/माती चे बोळके कुबेर भंडार स्वरूपात) पुजन व आरती करावी आणि रात्री स्थिर सिंह लग्नात श्रीमहालक्ष्मी ला प्रिय असणारे कमल गुट्टा 108 आणि 108 मुरड शेंगॐ श्री महालक्ष्मी नम: असा मंत्र म्हणूनअर्पण कराव्या पुन्हा आरती करावी.🚩🙏🏻

सर्वांना शुभ लक्ष्मीपूजन 🚩