Monday, 24 July 2017

Shivshankar sadhana

*श्रावण महिना चालू होत आहे,शिवाचे साधनेला सर्वानी तयार रहा,,,,,*
       
      *॥उपासना महिमा॥*

सृष्टीचा निर्माणकर्ता श्री ब्रम्हदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव हे आहेत. म्हणूनच मृत्यू किंवा मोक्ष या वर श्री महादेवाचा अंकुश आहे असे म्हटले जाते. तसेच गतजन्मातील संचित पातकांमुळे आपणास या जन्मात आकस्मिक मृत्यू , मतीमंदत्व, मानसिक व शारीरिक आसाद्य आजार, दुखे:, संकटे, हालअपेष्टा किंवा दारिद्र्य भोगावे लागते. या सर्वां पासून मुक्ती देण्याचे कार्य श्री महादेव करतात. भगवान शंकर म्हणजेच खरे निर्गुण, निराकार परब्रम्ह होय.अशा या मोक्षकारी महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी जो कोणी शिवाची उपासना करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. एकूणच या दिवशी केलेली उपासना हि मानवी जीवनाला सुख शांती व समृद्धी देण्याचा एक राज मार्ग आहे, अशी हि फलदायी उपासना आहे.

आता तुम्ही विचाराल हि उपासना करतात कशी ?
ज्या कोणाला आपल्या जीवनात सुख शांती प्राप्त करावयाची आहे त्या प्रत्येक व्यक्तीने मग तो कोणत्याही जातीचा असो व धर्माचा असो त्याने हि उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. व श्री महादेव म्हणजे सर्वात लवकर व साध्या पूजेने सुद्धा अति प्रसन्न होणारे दैवत आहे. म्हणूनच या देवाला भोळा शंकर असेही म्हटले जाते. एवढेच नाही तर आपल्या हातून अगदी अजाणते पणे जरी शिव पूजा घडली तरी हा भोळा शंकर लगेच प्रसन्न होतो. आणि उपासना करणे म्हणजे तरी काय ?

ज्या प्रमाणे आपण आपल्या प्रीय व्यक्तीस प्रसन्न करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी त्या व्यक्तीला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करतो किंवा त्या व्यक्तीला आवडणार्या वस्तू आपण भेट देतो त्याच प्रमाणे आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करणे किंवा त्या देवतेला त्या गोष्टी अर्पण करणे किंवा भेट देणे म्हणजेच त्या देवतेची उपासना करणे असे होय.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात त्याने भोळा महादेव लगेच प्रसन्न होतो. मग महादेवाला कोणत्या गोष्टी आवडतात ?

१) अभिषेक :- महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने हा भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो. मग तो अभिषेक तुम्ही साधे पाणी, दुध, दही किंवा उसाचा रस या पैकी कोणत्याही द्रव्याने केलात तरी चालतो.

२) फुले :- महादेवाला पांढरी फुले अर्पण केल्यास तो लगेच प्रसन्न होतो. मग आपण पांढरी फुले मुख्यत्वे धोतर्याची फुले अर्पण करून महादेवाला प्रसन्न करू शकता.

३) वृक्ष :- महादेवाला बेलाचा वृक्ष तसेच चंदनाचा वृक्ष हे सर्वात प्रीय आहे मग तुम्ही महादेवाला बेलाची पानें किंवा फळे अर्पण करू शकता. तसेच तुम्ही एखादे बेलाचे झाडाचे किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करून ते जरी वाढवलेत व त्याची पूजा केलती तरी त्याचे पुण्य अपार आहे. म्हणून या दिवशी बेलाच्या किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करावे किंवा हि झाडे दान द्यावीत. त्याने भोळा शंकर प्रसन्न होतो.

४) फळे, धान्य किंवा वस्त्र :- कवठ हे फळ महादेवाला अतिप्रिय आहे तसेच बेल फळ किंवा नारळ हे देखील महादेवाला प्रीय आहेत. महादेवाला मुठभर तांदूळ अर्पण करावेत, किंवा केळी हे फळ महादेवाला अर्पण करावे. किंवा अगदीच काही नसेल तर खडीसाखर अर्पण करावी. तसेच शुभ्र वस्त्र महादेवाला प्रीय असल्याने ते देखील तुम्ही अर्पण करू शकता.

५) स्तोत्रे :- शिवस्तुती चा पाठ वाचवा. शिवस्तुती हि सर्वात लवकर फलदायी होते. याने महादेव लगेच प्रसन्न होतात. तसेच शिवकवच पठन हे देखील अत्यंत उपयुक्त आहे.

६) उपासना मंत्र :- ll ओम नम: शिवाय ll हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे. या मंत्राच्या सतत च्या जपाने श्री महादेव लगेच प्रसन्न होतात. साधकाच्या सर्व मनो: कामना पूर्ण होतात. या मंत्राची शक्ती अद्भुत आहे. ह्या मंत्रासाठी दीक्षा, होम, संस्कार,मुहूर्त,गुरुमुखाने उपदेश इत्यादी कसलीही आवश्यकता नसते. या मंत्रात सर्व वेद व उपनिशिध्ये यांचे सार सामावले आहे.

७) दान धर्म :- सध्या कलयुग चालू आहे नि कलयुगात दान देणे हे अनन्य साधारण पुण्यकर्म समजले जाते, म्हणूनच श्री महादेवाला ज्या वस्तू प्रीय आहेत त्या पैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही गोरगरिबांना दान केलीत तर त्याचे हि फळ लाखो पटीने वाढते. या मध्ये तुम्ही दुध, तांदूळ, केळी , खडीसाखर, पांढरे वस्त्र, नारळ, बेलाचे व चंदनाचे झाडांची रोपे या गोष्टी दान देऊ शकता. त्याने पुण्यसंचय वाढून जीवनात सुखसमृधी प्राप्त होते यात शंकाच नाही.

८) ध्यान आणि शांतता :- शंभू महादेवाला ध्यान व शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रीय आहेत. ज्या घरात रोज ध्यान धारणा होते व ज्या घरात कलह नसतो त्या घरावर महादेवाची अपार कृपा असते. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी अंघोळी नंतर दहा मिनिटे व रात्री झोपताना दहा मिनिटे महादेवाचे ध्यान करावे या वेळी घरात शांतता ठेवावी व चंदनाचा धूप लावावा त्याने अपार मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होतात. व घरात बरकत होते. दारिद्र्य दूर होते.

९) मनातली इच्छा बोलणे :- ज्या प्रमाणे मुल रडल्यावर त्याची आई त्याला दुध पाजते म्हणजेच मुलाच्या इच्छेला आई लगेच प्रतिसाद देते त्याच प्रमाणे आपण या महादेवाची उपासना केल्यावर हा भोळा शंकर नक्कीच प्रसन्न होतो. नि हा प्रसन्न झाल्यावर आपण आपल्या मनातील इच्छा या देवतेस बोलून दाखवली तर ती नक्कीच पूर्ण होते असा आमचा अनुभव आहे. हि इच्छा आपण आपल्या मनात सतत घोळवावी त्याने फळ प्राप्ती लवकर होते.

खाली देलेली हि इच्छा एका कागदावर लिहून काढावी व रोज म्हणावी त्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

" हे शंकरा मी तुला शरण आलो आहे. साक्षात तूच माझा आत्मा असून, माझी बुद्धी म्हणजे पार्वती माता होय. माझे प्राण म्हणजे शिवगण आणि देह म्हणजे शिवालय आहे. सारे विषयभोग म्हणजेच तुमची पूजा असून झोप हि समाधी होय. माझे चालणे म्हणजे तुमची प्रदक्षिणा करणे, बोलणे म्हणजे तुमची स्तुती करणे असून मी जी जी कर्मे करतो ती सारी तुमची आराधनाच करतो आहे. माझ्या हात, पाय, वाणी,कान,डोळे,मन,देह या पैकी कशानेही जी पातके जाणतेपणी किंवा अजाणतेपणी घडली असतील त्या सर्वाना तू क्षमा कर. कारण तू दयेचा सागर आहेस. हे महादेवा तुझा जय जय कर असो !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक राशी नुसार गरिबांना कोणत्या प्रकारचे दान करावे या विषयी थोडेसे ! संपूर्ण वाचा व आवडल्यास जरूर शेअर करा !

महाशिवरात्रीला शिवशंकरास साध्या थंड पाण्याने अभिषेक केला असता तसेच विविध वस्तूंचे दान गरिबांना केले असता महादेव मनातली इच्चा पूर्ण करतात असा अनुभव आहे. या अभिषेकाचा व दानाचा महिमा अपार आहे. तसेच कुंडलीत ज्या ग्रहांचा दोष आहे ते दोष सुद्धा या दानामुळे दूर होतात.

अभिषेक कसा करावा ?

भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ॐ नमः शिवाय हा मंत्र म्हणून थंड पाण्याने अभिषेक करावा तसेच बिल्व पत्र , बेल फळ किंवा धोत्र्याचे फुल वाहावे.

राशी नुसार गरिबांना द्यायची दाणे खालील प्रमाणे !

मेष- मध , गूळ , उसाचा रस व लाल फुल !

वृषभ - कच्चे दूध, दही, पांढरे फुल !

मिथुन- हिरव्या फळांचा रस, हिरवे मूग, बिल्वपत्र !

कर्क- कच्चे दूध, लोणी, बिल्वपत्र व पांढरे फुल !

सिंह- मध , गूळ , शुद्ध तूप व लाल पुष्प !

कन्या- हिरव्या फळांचा रस, हिरवे मूग, बिल्वपत्र व निळी फुले !

तुळ - दूध, दही, रंगीत फुले !

वृश्चिक- मध, शुद्ध तूप, गूळ बिल्व पत्र व लाल फुल !

धनु- शुद्ध तूप , मध , बदाम, पिवळे फुल व पिवळे फळ !

मकर- मोहरीचे तेल , तिळाचे तेल , कच्चे दुध, जांभळे, निळे फुल !

कुंभ- कच्चे दुध, मोहरीचे तेल, तिळाचे तेल , निळे फुल !

मीन- उसाचा रस , मध , बदाम, बिल्वपत्र, पिवळे फुल व पिवळे फळ !

विशेष सूचना :-
शिवपूजन कालावधी :- महाशिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजेच २४:२८ ते २५:१८  या कालावधीत वरील पैकी कोणत्याही प्रकारे आपण शिवपूजन केलेत तर महादेव प्रसन्न होतात. या काळात केलेले शिवपूजन लाखो पटीने फलदायी होते. या काळात शिवाची पूजा करावी त्यांना अभिषेक घालावा, बेलाची पानें अर्पण करावीत. कवठ या फळाचा प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करावा. शिवाचे नामस्मरण करावे. शिवस्तुती किंवा शिव स्तोत्रे म्हणावीत. व मनातली इच्चा बोलावी. आपण जी इच्चा बोलाल ती पूर्ण होते असा आहे या महाशिवरात्रीच्या उपासनेचा महिमा.

वरील प्रकारे जर आपण शिवाची उपासना केलीत तर ऐहिक वैभव, स्वास्थ्य व मानसिक शांती लाभेल यात तीळ मात्रही शंका नाही. चला तर मग आता पासूनच उपासनेला सुरवात करून आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवन सुख संपूर्ण बनवूयात.

ll श्री स्वामी समर्थ ll

Sunday, 23 July 2017

मानेचे विकार

♦ *मानेच्या मणक्‍याचा स्पॉंडिलायसीस*♦

संधी म्हणजे दोन अवयवयांना सांधणारे अवयव. पण यात वात झाला किंवा चुकीच्या पद्धतीने हलचाल झाली की त्या अवयवाची पुरती बोंब लागते. कधीकधी हे आयुष्यभराचे दुखणे होते. त्यात स्पॉंडिलायसीस झाले की संपलेच सगळे. उठता बसता मानेवर, पाठीवर कुत्र्याचा पट्टा बांधल्यासारखा पट्टा बांधावा लागतो. पण हा आजार नेमका कसा होतो आणि त्यावर उपचार काय आहेत हे आपण आज जाणून घेऊया.

घर्षणाने जीर्णशीर्ण झालेला वयोमानाने उद्‌भवणारा मानेचा आजार म्हणजेच सर्व्हायकल स्पॉंडिलायसीस. सर्वप्रथम हा आजार सुरू होताना दोन
मणक्‍यांच्या मध्ये असणारी गादी (डिस्क)मधील पाण्याचे प्रमाण कमी होण्यास सुरू होते. त्यामुळे त्यातील असणारे कार्टीलेज मणक्‍याच्या बाहेर निघून
मज्जारज्जूवर दबाव टाकायला सुरुवात करते. अगोदरच मज्जारज्जू हा मणक्‍यातील एका छोट्या कॅनेलमधून कंबरेपर्यंत खाली गेलेला असतो. त्यावर मणक्‍यातून ही गादी सरकल्यामुळे मान दुखणे व त्याच प्रमाणे एक किंवा दोन्ही हातांमध्ये वेदना होणे, हातांमध्ये मुंग्या येणे व सुन्नपणा येणे अशी
लक्षणे दिसून येतात.
गादी सरकण्याची (स्लीप डिस्क) कारणे
*अचानक मानेला झटका लागणे.
* स्थूलपणा
* मणक्‍याला झालेला अपघात
* मानेला असलेला ताण
* वयोमानानुसार मणक्‍यांची झीज
*अचानक वजन उचलण्यामुळे व

*मणक्‍यातील सरकलेली गादी
आजारातील लक्षणे ः

कंबरेचे स्नायू खूप जास्त खेचलेले असतात.नजिकच्या भूतकाळात रोग्याने खूप वजन उचललेले असते.अति खोकल्यानेही हा आजार उद्‌भवू शकतो.अचानक मान वाकडी करणे अथवा मानेला झटका बसणे.

वेदना ः

*साधारणतः मानेमध्ये किंवा कंबरेमध्ये.

*मानेचे दुखणे डोक्‍याकडे, दोन्ही काखांकडे व हातापर्यंत सरकत जाते.

*अशा प्रकारचे दुखणे असह्य असते.

*वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली खोकणे, शिंकणे, चालणे किंवा समोर

*झुकणे यामुळे या प्रकारचे दुखणे वाढू शकते.

*आराम केल्याने वेदना कमी होतात.

*हातामध्ये किंवा पायामध्ये मुंग्या येतात किंवा सुन्नपणा येतो.

तपासण्या ः
मानेची क्ष-किरण तपासणी
सिटी स्कॅन
एम.आर.आय. स्कॅन. ही अतिशय महत्वाची तपासणी असून आपल्याला गादी किती सरकली आहे याची कल्पना येते. त्याचप्रमाणे मानेपासून
हातांमध्ये येणाऱ्या दबावाचे किती प्रमाण आहे हे या तपासणीत नमूद होते.

उपचार ः
साधारणतः 8 ते 12 आठवडे पूर्ण आराम करावा लागतो.
शक्‍यतो हाडासारखा कडक भाग झोपण्यास घ्यावा.
अतिशय तीव्र स्वरुपाच्या
आजारामध्ये डोक्‍याला ट्रॅक्‍शन लावून फिजियोथेरपी करता येते.

मानेचा सांधा जोडणे ः
ही मानेच्या मणक्‍यातील शस्त्रक्रिया असून मणक्‍यातील सरकलेली गादी काढून टाकण्यात येते. ही शस्त्रक्रिया साधारणतः समोरून मानेकडे केली जाते. या शस्त्रक्रिये
मध्ये बरेचदा दुर्बिणीचा वापरही केला जातो. दबाव निघाल्यानंतर दोन मणक्‍यांच्यामध्ये हाडांचा तुकडा किंवा कृत्रिम केज बसवली जाते व वरच्या आणि खालच्या मणक्‍यांना प्लेट आणि स्व्रूाच्या सहाय्याने बांधले जाते. यालाच सर्व्हावल फ्युजनही म्हणतात. पण ही शस्त्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. आजच्या घडीला या आजारासाठी सर्वात नवीन उपचार पद्धती आहे. यामध्ये दोन मणक्‍यांच्या मध्ये सरकलेल्या गादीच्या जागी कृत्रिम सांध्याचे
प्रत्यारोपण केले जाते. अशा प्रकारचा सांधा दोन मणक्‍यांच्यामध्ये टाकल्यामुळे
मानेच्या सर्व प्रकारच्या हालचाली योग्य प्रकारे होत राहतात. त्यामुळे
मणके एक दुसऱ्यांना बांधण्याची गरज राहत नाही. त्याचप्रमाणे मणक्‍याच्या मध्ये हाडाचे तुकडे किंवा प्लेट व स्व्रूा वापरायची गरज लागत नाही. पण ही
उपचार पद्धती अशा प्रकारे अशाच व्यक्‍तींना वापरण्यात येते. ज्यांना खूप जास्त शारीरिक हालचाल करण्याची गरज भासते.

मानेच्या सर्व प्रकारचे हालचाली व्यवस्थित राहतात.आजूबाजूच्या मणक्‍यांशी कमी घर्षण होते.बोन ग्राफिटींगची गरज लागत नाही.ऑपरेशनच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मानेची हालचाल सुरू होते.आपले सामान्य आयुष्य लवकरात लवकर सुरू करता येते.
तेव्हा मानेच्या या आजारामध्ये सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट ही उाची सर्वात अभिमत उपचार पद्धती असण्यास हरकत नाही.                             🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

स्वामी काकड़ आरती

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
       *🌞काकड आरती🌞*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*चरण दावे जगत्पते !*
*स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*चरण दावे जगत्पते !*
*स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!*
*भक्तजन येउनिया !द्वारी उभे* *स्वामीराया !*
*चरण तुझे पहावया !तिष्ठती* *अतिप्रती !!१!!*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*चरण दावे जगत्पते !*
*स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!*
*भक्तांच्या कैवारे समर्थ निर्धारे*
*हात ठेउनिया चरणावरी !!*
*गातो आम्ही तुझी स्तुती !!२!!*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*चरण दावे जगत्पते !*
*स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!*
*पूर्णब्रम्ह देवाधिदेव !निरंजना तुझा* *ठाव !!भक्तांसाठी देहभाव !धरिसी तू* *विश्वपती!!३!!*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*चरण दावे जगत्पते !*
*स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!*
*स्वामी तूची कृपाधन !उठोनी देई* *दर्शन !!*
*स्वमिदास चरण वंदून !!मागतसे* *भावभक्ती!!४!!*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*चरण दावे जगत्पते !*
*स्तवितो तुझी आदिमुर्ती !!*
*चरण दावे जगत्पते !*
*स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*!! स्वामी समर्थ तारक मंत्र !!*
*नि:शंक हो | निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे || अतर्क्य* *अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी ||1||*

*जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय || आज्ञे वीणा काळ ना नेई त्याला | परलोकी ही ना भीती तयाला || 2 ||*

*उगाची भीतोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे || जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा||3||*

*खरा होई जागा | श्रद्धेसहित | कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त || कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू | स्वामी देतीVल साथ||4||*

*विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ | स्वामीच या पंचप्राणामृतात || हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती | न सोडी कदा स्वामी जया घेई हाती ||5||*

*। ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ ।।*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*ॐ श्री सदगुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी* *समर्थ महाराज कि जय....🙏🏻*

*श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक भक्तवत्सल भक्ताभिमानी*
*श्री पाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरूदेव दत्त समर्थ ।🙏🏻*
*अवधुत चिँतन श्री गुरूदेवदत्त*    
                                                                                         🐚🐚🐚 *भूपाळी* 🐚🐚🐚 
 
    *🌻!!श्री स्वामी समर्थ !!🌻*             
                *स्वामीसुत*

*उठा उठा सकळ जन ! पाहूचला स्वामी चरण !!*
*तुटोनि जाईल भवबंधन ! भावेचरण पाहतांची !!धृ!!*
*त्यांचे होतांचि दर्शन ! तृप्त होतीन नयन !!*
*भावे घालोनि लोटांगण ! चरण तुम्ही वंदाते !!१!!*
*कोटि तीर्थ चरणापाशी ! त्या चरणी सदभावेसी !!*
*विनदुनि तुम्ही अहर्निशीं ! जन्म मरण चुकवा कीं !!२!!*
*रुप पाहाताचि लोचनी ! सुख होईल साजण !!*
*अज्ञान जाऊनि तत्क्षणीं ! ज्ञानज्योती प्रगटेल !!३!!*
*जपा नाम निर्धारी ! पावन ते पंचदशाक्षरी !!*
*तेणे चुकूनि तुमची फेरी ! मोक्षपद मिळेल कीं !!४!!*
*परब्रम्ह हे अवतरले ! म्हणुनी नाम ते पावलें !!*
*आता जपा तोंचि वाहिले ! तुम्हा सुख व्हावया !!५!!*
*स्वामी नाम हाचि वन्ही ! महापापें ती तत्क्षणीं !!*
*तृणवत टाकील जाळुनी ! प्रातःकाळी स्मरतांची !!*
*धर्मलोप बहु झाला ! तेणे भूभार वाढला !!*
*म्हणुनी समर्थ अवतरला ! जड मूढा ताराया !!७!!*
*प्रातःकाळी दर्शन घेता ! मुक्ती मिळेल सायुज्यता !!*
*तेणे चुकेल जन्म व्यथा ! भावे दर्शन घेताचि !!८!!*
*रुप सुंदर सुकुमार ! दिसे आति मनोहर !!*
*पाहुनि तेंचि सत्वर ! कृतार्थ तुम्ही व्हाल कीं !!९!!*
*कोटी सुर्याची ही प्रभा ! चला दर्शन घ्यावया !!१०!!*
*सत्य सांगे स्वामीसुत ! स्वामी पहा हो प्रेमयुक्त !!*
*तेणे व्हाल जन्ममुक्त ! संदेह काही असेना !!११!!*
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

श्री जोतिबा

जोतिबा : दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रख्यात दैवत. कोल्हापूरपासून वायव्येस सु. १४ किमी.वर पन्हाळा तालुक्यात पायथ्यापासून सु. ३०५ मी. उंचीचा जोतिबाचा डोंगर असून त्यावर जोतिबाचे ठाणे आहे. या डोंगराला ‘रत्नागिरी’ असेही नाव आहे. जोतिबाच्या मंदिराजवळ गुरवांची वस्ती असून ते जोतिबाचे पुजारी आहेत. ही गुरवांची वस्ती ‘वाडी-रत्नागिरी’ म्हणून ओळखली जाते. प्राचीन काळापासून हा डोंगर एक पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. वाडी-रत्नागिरी ह्या खेड्यात काही प्राचीन मंदिरांचा समूह असून त्यांतील केदारलिंग, केदारेश्वर,रामलिंग आणि चर्पटांबा किंवा चोपडाई ह्या देवतांची मंदिरे विशेष महत्त्वपू्र्ण आहेत. यांतील केदारलिंगाचे किंवा जोतिबाचे मंदिर प्रमुख असून मध्यभागी आहे. जोतिबा हा मूळचा ज्योतिर्लिंग केदरनाथ मानला जातो. कोल्हापूरच्या अंबाबाईला किंवा महालक्ष्मीला कोल्हासुर, रत्नासुर इ. दैत्यांच्या संहारकार्यात मदत करण्यासाठी प्रत्यक्ष केदारनाथच हिमालयातून जोतिबा डोंगरावर येऊन राहिला आणि त्याने दैत्यसंहार करून तेथे आपल्या केदारलिंगाची स्थापना केली, अशी आख्यायिका आहे. अंगापूरकरविरचित मराठी केदार विजयात (सु. १७७९) ही कथा आलेली आहे. केदारेश्वर, केदारलिंगे, केदारनाथ, खळेश्वर इ. जोतिबाचीच नावे आहेत. जोतिबा हे उच्चारसुलभ लौकिक रुप ज्योतिर्लिंग ह्या शब्दापासूनच बनले असावे.

ज्योतिबाची मुर्तीज्योतिबाची मुर्ती

केदारलिंगाचे मूळ मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार प्रथम किवळ या गावचा पाटील नावजी ससे (रावजी साया असाही उल्लेख आढळतो) याने केल्याचे सांगतात. नंतर १७०३ मध्ये राणोजीराव शिंदे यांनी त्याचा पुन्हा जीर्णोद्धार करून सध्याचे मंदिर बांधले. सध्याची केदारेश्वर व रामलिंग ही मंदिरे अनुक्रमे दौलतराव शिंदे आणि मालजी निकम पन्हाळकर यांनी अनुक्रमे १८०८ व १७८० मध्ये बांधली. चोपडाईचे मंदिर प्रीतिराव चव्हाण हिंमतबहाद्दर यांनी १७५० मध्ये बांधले. केदारेश्वर मंदिरापुढे काळ्या पाषणाचे दोन नंदी आहेत. वाडीच्या बाहेर उत्तरेकडे थोड्या अंतरावर यमाईचे मंदिर असून तेही राणोजीराव शिद्यांनी बांधले. यमाईच्या मंदिरासमोरच दोन कुंडे वा तीर्थे असून त्यांतील एक तीर्थ जिजाबाईसाहेब यांनी १७४३ मध्ये बांधले असून दुसरे ‘जमदग्न्य तीर्थ’ राणोजीराव शिंद्यांनी बांधले आहे. डोंगरावर आणखीही काही तीर्थे व दोन पवित्र झरे आहेत. एका झरा कुशावर्त कुडांतून निघतो, तो ‘गोडा’ म्हणून आणि दुसरा उत्तरेकडून येणारा व वारणेला मिळणारा झरा ‘हैमवती’ नावाने ओळखला जातो. जोतिबा डोंगरावरील मंदिरे डोंगरावरच सापडणाऱ्या निळसर रंगाच्या उत्तम दगडांनी बांधली असून त्यांची रचना हिंदू पद्धतीची आहे.

येथील प्रमुख देव जोतिबा असून तो पौगंडद ऋषीचा मुलगा म्हटला जातो. परंपरेनुसार रत्नासुर नावाच्या दैत्याचा त्याने या ठिकाणी वध केल्यामुळे हे स्थान रत्नागिरी म्हणून ओळखले जाते. जोतिबामंदिरातील गाभारा पितळी पत्र्याने मढविलेला असून जोतिबाच्या मागील कमान व त्याचे आसन चांदीचे आहे. जोतिबाची मूर्ती चतुर्भुज व काळ्या पाषाणाची असून ती १·०६ मी. उंच आहे. हातात खड्‌ग, पानपात्र, त्रिशूळ व डमरू आहे. मस्तकावर गंगा असून वाहन अश्व आणि उपवाहन सर्प आहे. भैरव, खंडोबा व कोकणातील रवळनाथ यांच्याशी जोतिबाचे बरेच साम्य आहे. मंदिराच्या परिसरात अनेक दीपमाळा आहेत. जोतिबाची भाऱ्या यमाई. तिची मूर्ती ओबडधोबड. दगडी व शेंदूर फासलेली आहे. चैत्री पौर्णिमेला जोतिबाची मोठी यात्रा भरते. यात्रेच्या वेळी जोतिबाची पितळी उत्सव मूर्ती पालखीत बसवून समारंभपूर्वक लग्नासाठी यमाईच्या मंदिराकडे नेतात. जोतिबा व यमाई यांच्या विवाहसमारंभाचा एक भाग म्हणून त्यांच्यामध्ये शिक्काकट्यार ठेवतात. ‘ज्योतिबाचा चांग भले’ अशा भाविकांच्या गजराने डोंगर दुमदुमून जातो. रा. चिं. ढेरे यांनी जोतिबा हे खंडोबाप्रमाणेच क्षेत्रपाळ दैवत असल्याने मत मांडले आहे.